वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे खेळला जात आहे. जिथे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत मालिका जिंकली आहे. त्यामुळे या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाच्या नजरा कॅरेबियन संघाला क्लीन स्वीप करण्यावर आहेत. च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना १ विकेट गमावून ११५ धावा केल्या होत्या. मात्र, या रोमांचक सामन्यातील २४ षटके संपल्यानंतर पावसाने दणका दिला, त्यामुळे सामना मधेच थांबवावा लागला.
वास्तविक, वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामनान्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. यामुळे २४ व्या षटकात खेळ थांबवण्यात आला. या शेवटच्या सामन्यात भारतीय कर्णधार धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे २४ व्या षटकात टीम इंडियाने एका विकेटच्या मोबदल्यात ११५ धावा केल्या आहेत. ही विकेट कर्णधार धवनची होती. सध्या शुभमन गिल ५१ आणि श्रेयस अय्यर २ धावांसह खेळत आहेत. मात्र या रोमांचक सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे.
वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात खेळल्या जाणार्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात धवन आणि शुभमन गिल यांच्या सलामीवीरांमुळे टीम इंडियाने प्रथम फलंदाजीला सुरुवात केली. जिथे टीम इंडियाला पहिला झटका शिखर धवनच्या रूपाने बसला. त्याने ७४ चेंडूत ७ चौकारांसह ५८ धावांची खेळी खेळली. मात्र २३ व्या षटकात फिरकीपटू हेडन वॉल्शने कर्णधार धवनला आपला शिकार बनवले. शिखर धवनला जिथे पुढे जाऊन फ्लिक करायचा होता, तिथे चेंडू उभा राहिला आणि मिडविकेटवर निकोलस पूरनने त्याचा झेल घेतला, त्यानंतर त्याला पॅव्हेलियनमध्ये जावं लागलं.
त्यांतर पावसाने व्यत्यय आणल्यामुळे सामना काही वेळ थांबला मत्र नात्र पुन्हा सुरु झाला आणिभारताने 119 धावांनी सामना जिंकला.